Monday, December 3, 2012

Life of Pi – a beautiful movie of brilliant analogies…


The time we were leaving the theater, my wifey asked me if I liked the movie and I was like Not actually… I won’t be able to watch it for the 2nd time… or maybe I can… The reason being everyone including initial reels of the film talk about the experience of God but I couldn’t agree to that. It was only after a good nights’ sleep I found out following analogies and then there was no reason to not to praise the film.

1. Pi Patel represents any human being

2. Life boat represents the life of that human being.

3. Richard Parker (the royal Bengal Tiger) till the end of the film represents the mind of that human being. Till the time Richard (mind) controls Pi (human being), Pi has no control over his life boat (life) and the time Pi starts controlling Richard (mind) he gets the control of his life boat (life). Richard (mind) has the power to destroy the Pi or to make him survive. The important thing was how Pi (human) uses the Power of the Richard (his mind).

4. Pacific Ocean and all natural calamities represent the Destiny of that human. Some days he faces storm, flying fishes, whale etc (ill fate) and some day he gets to see bright sunny morning, food etc (lucky days). There is no other way that Pi (human) escapes the ocean (destiny) but to keep on trying with all his energy, brilliance and the faith on the God to get out of the ocean.

5. The unheard floating island represents the ‘Moh / Maya’ or worldly pleasures (Bhautik Sukh). Though initially it fooled Pi with abundance of food and water, very soon he realized that it is the death trap (vicious circle of birth and rebirth) and not the final destination. (Why undiscovered / unheard Island - coz moh takes different shape for each one of us)

6. Tooth of a man on that island represents the Guru or the wisdom he gained.  In absence of that he wouldn’t have left that island (Moh).

7. Shore of the Mexico represents the final destination or the Moksha. It required all possible efforts on Pi’s Part (Human) to reach the shore and then ocean (his destiny) helped him to reach the Shore (Moksha).

8. Richard Parker (the royal Bengal Tiger) at the end represents your closed pals (your parents/ friends / life partner / relatives etc). When they die or the time your account is tallied with them they leave you unceremoniously, never to look back.

My take on the film:

1. 3D - I feel there was no need for making the film in 3D. Avatar completely justifies the technique but this isn’t. I feel the analogies are so subtle that the technique overpowers the real jist.

2. Music – it dissolves in the film so well and thus helps in improving the impact of the film in our minds. (Thank god the music director has avoided any loud unnecessary music like Govinda Govinda Govinda in Sarkar) and what a brilliant understanding of Indian Music this foreigner has!

3. Intial reels / original story – there was no need of showing his faith in all religions / his juvenile love towards Anandi / story of his name for the progress of the film. Whatever small impact it had (to show his belief in God and ceremonious departure from Anandi) could have been covered from the thoughts of Irfan Khan.

4. End / original story – I would have loved to know about how Pi reached to the present day after he reached Mexico.

5. Technical fault in the plot - One doesn't matter how strong, would not be able to survive in the Pacific ocean for 200+ days considering the freezing cold temperatures in the nights. We can still understand if its an Indian Ocean.

6. Suraj Sharma – Sheer Briliance. What an actor we have got.

7. Irfan Khan – His accent disturbes because Suraj’s accent is perfect  where as he had tried to force some accent.

8. Tabbu – there was no need to rope in an actor like Tabbu for such a small role.

9. Last scene that Tiger leaves him unceremoniously. I am still shaken by it. Director’s brilliance I suppose (Novel mustn't have this end I feel)

10. Ang Lee / author of the Novel – Thank you for such a brilliant creation.

Saturday, August 4, 2012

Kahi Goshti Haravu Nayet Mhanun - 4

ही वेळ निघून जाईल...

फार वर्षां पूर्वीची गोष्ट आहे. विक्रमादित्य नावाचा राजा कपिला नगरीवर राज्य करत होता.

राजा मोठा धर्मशील होता. पराक्रमी होता. आपल्या प्रजेवर त्याचे निरातिशय प्रेम होतं. नागरी मधेही सगळेच अलबेल होते. सुख, समृद्धी, शांती आणि समाधान सगळी कडे नांदत होते. प्रजेलाही राजाविषयी प्रेम आणि आदर होता. राजाची सुंदर सत्वशील  पत्नी, एक उमदा राजपुत्र, गोंडस राजकुमारी... असं अगदी दुष्ट लागण्या सारखं सगळं चाललं होतं. त्यामुळे राजाही खुश होता.

एके दिवशी तो विचार करतो की 'सगळ उत्तम चाललय तर प्रजेला एक छानशी मेजवानी द्यावी आपण... आपलं प्रजेवरच प्रेम व्यक्त करायला ह्याहून चांगला उपाय नाही आणि खरतर आपल्याकडे कारण ही आहेच की... पुढच्याच मासात आपला जन्मदिवस आहे'.

तो राणीशी बोलतो आणि मेजवानीचा बेत पक्का ठरतो... नगरीत सर्वदूर आमंत्रणं जातात. राज्यातला सर्वांना अगदी झाडून निमंत्रणं जातात. इकडे राजमहालही मेजवानी साठी चांगलाच सजतो. उंची शामियाने उभारले जातात... देशविदेशातून नामांकित आचारी बोलावले जातात... सगळी कडे जणू उत्सवाचं वातावरण असतं.

आणि अखेरीस मेजवानीच दिवस उजाडतो. गावातील लहाना पासून वृद्धापर्यंत, राव पासून रंका पर्यंत आणि मूढा पासून योगी ऋषींपर्यंत सगळे जातीनं हजर असतात... सगळ्यांनी आपल्या लाडक्या राजाला त्याच्या वाढदिवसाची काहीना काही भेट आणलेली असते. राजा खूप प्रेमानी सगळ्यांची भेट स्वीकारतो... सगळ्यांना जेवून जाण्यास सांगतो आणि जातीनं प्रत्येकाला हवं नको ते पाहतो... बेत फक्कडच असतो. सगळे पोटभर जेऊन, तृप्तं होऊन, राजाला अनेकानेक आशिर्वाद, शुभेच्छा देऊन आपापल्या घरी निघून जातात.

सगळे गेल्यावर राजा राणी एक एक करून भेटवस्तू पाहू लागतात. प्रत्येकानी आपापल्या ऐपतीप्रमाणे राजाला फुल ना फुलाची पाकळी भेट म्हणून दिलेली असते. प्रजेचं  त्याच्याविषयीचं प्रेम पाहून राजाही खूप खुश होतो. आणि तेवढ्यात राजाची नजर गावाबाहेरच्या एका साधूने दिलेल्या भेटवस्तू कडे जाते. ती एक पाटी  असते. त्यावर एक वाक्य कोरलेलं असतं "ही वेळ निघून जाईल".

तत्क्षणी राजाचा चेहेरा बदलतो. रागानी तो अक्षरश: थरथरू लागतो. गावाबाहेरच्या त्या साधूचा त्याला प्रचंड राग येतो. इतकं सगळं छान चालू आहे, ऐश्वर्य आहे आणि हा नीच साधू म्हणतो हि सुखाची वेळ निघून जाईल? काय म्हणावं काय अश्या माणसाला...??? हा साधू नाहीच.  नक्कीच कोणीतरी भोंदू बाबा असणार.

लगेचच राजाचा हुकुम सुटतो, "जिथे असेल तिथून त्या  साधूला कैद करा आणि कारागृहात डांबून ठेवा". झालं राजाच्या इच्छे प्रमाणे होतं. त्या साधूची बाजू ऐकूनही न घेता, त्याला सरळ कारागृहात डांबलं जातं.

अशीच काही वर्ष सुखा समाधानात जातात. राजा त्या साधू आणि  त्या पाटी बद्दल पूर्ण विसरलेला असतो. पण नियतीच्या मनात काही वेगळच असतं  . राजाच नशीब पालटतं. कपिला  नगरीवर भयंकर दुष्काळाच सावट पसरतं. नगरीतल्या नद्या आटतात, विहिरी कोरड्या पडतात, सगळी पिके करपून जातात. राजा आपले धान्यागार प्रजेसाठी रिते करतो. प्रजेसाठी नव्या विहिरी खोदतो. त्यावर्षी कसेबसे भागते पण पुढच्या वर्षीही  तीच परीस्थिती... आता राजा कडे पर्याय नसतो. राजा आपला सगळा खजिना रिकामा करतो आणि परराज्यातून अन्यधान्य आणि पाण्याची व्यवस्था करतो.

इकडे आसपासच्या राज्यांना कपिला नगरीची ही अवस्था कळते. राजाचा वाईट काल आल्याचे पाहून एरवी राजाचे नाव काढताच ज्यांची पाचावर धारण बसायची असे कपिला नगरीच्या आसपासचे छोटे राजे डोकी वर काढायला लागतात. कपिला नगरी गिळंकृत करण्याच्या उद्देशाने चोहोबाजूनी परकीय आक्रमणे होतात.  दुष्काळानी आधीच संत्रस्त झालेले सैनिक तरी किती तग धरणार? अती बलाढ्य अश्या कपिला नगरीचा सपशेल पाडाव होतो. राणीला, राजपुत्राला आणि राजकन्येला कैद करून इतर राजे घेऊन जातात. राजा पार देशोधडीला लागतो. नियतीचे फासे फिरले कि असेच व्हायचे.

राजा विमन्सक अवस्थेत रानोमाळ भटकत असतो. त्याला काय करावे ते सुचत नसते. गेलेले वैभव आपला परिवार कसा परत मिळवावा ते काळात नसते. त्याला उमगत नसते की आपण असे काय पाप केले म्हणून आपल्यावर ही वेळ आली? हा कसला शाप भोगतोय आपण?

यातून काहीच मार्ग दिसेना तेव्हा राजाचे मन कलुषित व्हायला लागते. तो विचार करतो, की अश्या लाचारीच्या जगण्यापेक्षा मरण बरे. राजा इतका हताश होतो की आत्महत्येचे विचार राजाच्या मनात येऊ लागतात आणि त्याच्यावर तो अंमल करायला ही निघतो.

कपिला नगरीच्या उंच पर्वतशीखरावरून तो उडी मारणार तेवढ्यात गावा बाहेरच्या त्या साधूने दिलेल्या त्या पाटीची त्याला आठवण होते. "ही वेळ निघून जाईल". हे वाक्य वाचून तेव्हा केवढा राग आला होता राजाला पण आता  हेच  वाक्य राजाला कमालीची उभारी देऊन जाते - "ही वेळ निघून जाईल". किती योग्य आहे हे वाक्य. राजाला मनोमन पटते जसा चांगला काळ राहिला नाही तसा हा वाईट काळही राहणार नाही. राजाच्या अंगात नवीन उत्साह संचारतो आणि त्याला त्याची चूक कळते. काहीही ऐकून न घेता आपण त्या साधूला कैदेत टाकले. पण आता ही वेळ पश्चातापाची नाही तर कृतीची  आहे. आपले राज्य, आपले गातवैभव आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे आपले कुटुंब परत मिळवायलाच पाहिजे असे राजा पक्के मनाशी ठरवतो.

ब्राह्मण वेशात राजा नगरीत राहायला लागतो आणि हळू हळू आपल्या जुन्या सैन्याशी संपर्क करतो. त्या पुण्यश्लोक राजाला मदत करायला कापिलावासी आनंदानी होकार भारतात. राजा सर्व तयारीनिशी जेत्या राजांवर आक्रमण करतो. सगळे पराक्रमाची शर्थ करतात आणि हळू हळू कपिला नगरी परकीय राजवटीतून मुक्त होते.

राजाला त्याचे गतवैभव, कुटुंब सर्व परत मिळते. तो कैदेतून त्या साधूला बाहेरकाढतो त्याची मनापासून माफी मागतो, त्याचा यथायोग्य सत्कार करतो आणि मोठ्या सन्मानी त्याला परत पाठवतो.

आणि आता अजून तरी राजाची सुखाची वेळ निघून गेलेली नाही.



Tuesday, May 29, 2012

Kahi goshti visarunayet mhanun - 3

दु:खाची पोती 

फार पूर्वीची गोष्टं आहे... जगातली सगळी माणसं आपापल्या दु:खानी अगदी वैतागून गेली होती... सगळ्यांना वाटायचं की देव आपल्याशीच असं का वागला? म्हणजे मला एवढं मोठ दु:खं आणि बाकी सगळ्यांची इवलीशी दु:खं ... मीच असं काय  पाप  केलाय  मग  माझ्याच  वाट्याला का ही दु:खं ...

आणि गंमत  म्हणजे सगळ्यांनाच असं वाटत होतं... मग काय... एके दिवशी सगळे लोक एकत्र आले आणि आपापल्या दु:खाचं पोतं उचलून  सरळ  देवा कडे आले... 

एवढ्या सगळ्या लोकांना एकदम  आलेलं पाहून देव बाप्पा ही जरा गांगरून  गेले... जरा गोंगाट शांत  झाल्यावर  त्यांच्यातल्या एका म्होरक्याने आपलं गाऱ्हाणं देवाला सांगितलं... देवानी एक  क्षण  भर  विचार केला मग  सगळ्यांना म्हणाला कि एक काम  करा, आपापली दु:खाची पोती तो तिथे कोपरा दिसतोय  ना तिथे नेऊन ठेवा.. देवाच्या सांगण्या प्रमाणे सगळे आपापली पोती नेऊन  ठेवतात... 

मग  देव म्हणतो,"आता असं बघा, मी हि भूलोकीची पोती माझ्याकडे कडे काही ठेऊ  नाही शकत... मला हि काही नियम पाळावे लागतात  बाबानो... पण  तुम्हाला एक मदत करू शकतो... नियमांना थोडी बगल मारतो आणि तुम्हाला अशी परवानगी देतो कि तुम्हाला जे पोतं  हलकं वाटतंय ते तुम्ही घ्या आणि सुखानी परत जा ... म्हणजे अश्यानी माझ्याकडची सगळी पोती ही संपतील  आणि तुम्हाला कमी दु:खाची हलकी पोती ही मिळतील... काय ? पटतोय  का उपाय...?"

देवाच्या ह्या उपायावर सगळे बेदम खुश झाले... त्यांना आत्ता पासूनच हायसं वाटायला लागलं... सगळे हो म्हणतायत  न  म्हणतायत  तोच  "तथास्तु" म्हणून  देव  आंतर्धान  पावला...

मग  काय... देवानी  सुचवल्या प्रमाणे सगळेजण  आपल्याला हलकं वाटेल  ते पोतं उचलून  चालू  लागले... पण  ते थोडं फार अंतर गेले असतील  नसतील  तोच त्यांना आपल्या पाठीवरचं  मगाशी हलकं वाटणारं पोतं कमालीचं  जड वाटू लागलं... अजून  थोडं अंतर गेल्यावर त्यांना हे पक्क कळून  चुकलं  कि आपलाच  पोतं इतरांपेक्षा हलकं  होतं.... 

पण  आता सौदा झाला होता... देव अंतर्धान  पावला होता....

courtesy: वादळवाट 

Monday, March 26, 2012

Kahi goshti haravu nayet mhanun - 2

साधु आणि दरी

एक साधु हिमालयाच्या डोंगर दर्यातून भटकत असतो... दररोज भगवंताची आराधना करावी, ध्यान धारणा करावी आणि सृष्टीतील ईश्वरास धुंडाळत भटकत राहावं असा त्याचा रोजचा दिनक्रम...


एके दिवशी असाच फिरत फिरत तो एका उंच, दुर्गम अश्या कड्यावर चढून गेला.. रस्ता मोठाच कठीण.. खडतर, खाच खळगे असलेला.... वर चढे पर्यंत त्याची पूर्ण दमछाक झाली... हिमालयाच्या भर थंडीत त्याला कष्टानी दरदरून घाम फुटला, पाय बोलत होते... थकवा आला होता... पण समोर बघतो तो काय... खाली दिसणाऱ्या दरीच मनोहारी विहंगम दृश्य.. बघता क्षणी त्याचा थकवा पार कुठल्या कुठे उडून गेला... ते असीम सृष्टी सोंदर्य पाहून जणू त्याची समाधीच लागली... भूतलावर स्वर्ग अवतरला होता तिथे.. त्याला ईश्वराचा साक्षात्कारच जणू झाला..


तो साधु त्या मनोवेधक दृश्याच्या इतक्या प्रेमात पडला कि त्याला त्याचे जीवन तिथेच संपवसे वाटले... याहून अनोखे ह्या जगात काहीच असू शकत नाही ह्याची त्याला खत्री पटली आणि बघता बघता त्याने त्या दरीत उडी घेऊन आत्माहुती दिली...

वर्षान मागून वर्ष उलटून गेली.. युगान मागून युगे... ते लोभस दृश्य पाहण्याचे परम भाग्य कोणाच्याच नशिबी नव्हतं... पण एके दिवशी अचानक असाच एक मस्त कलंदर योगी पुन्हा त्याच जागी पोचतो...

त्यालाहि त्या पहिल्या साधु प्रमाणेच तेथील ईश्वरी अस्तित्वाची प्रचीती येते... तो हि पुरता मोहरून जातो आणि त्याची हि खात्री पटते कि ह्या हून स्वर्गीय असे काहीच नाही... त्याच्या हि मनात विचार येतो कि बस इथेच आपले आयुष्य संपून जावे... पण क्षणभरच...

त्याला जाणवते कि जर आपण आपले आयुष्य इथेच संपवले तर अजून कोणी इथे येई पर्यंत हे अतीव सुंदर दृश्य कोणीच बघू शकणार नाही.. अजून कोणालाच ह्या ईश्वरी कृपेचा प्रत्यवाय येणार नाही.. जर आज आपण हे दृश्य इतरान ना दाखवले नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे...

आणि तो त्याचं उर्वरित आयुष्य लोकांना त्या कड्यावर घेऊन जाऊन ते विभोर दृश्य दाखवण्यात घालवतो...
त्या कृपाशील योग्या मुले आज कित्येक लोकांना तिथे ईश्वरी साक्षातकार झाल्याचं लोक सांगतात...

Saturday, January 21, 2012

Kahi Goshti Haravu nayet mhanun - 1

ससा कासव and changing trends of management 

१---------------------

ससा आणि कासव दोघे हि शर्यत लावतात कि जो कोणी पहिला त्या दूरवरच्या टेकडी वर आधी चढून दाखवेल तो जिंकला... सश्याला आपल्या वेगाचा प्रचंड अभिमान आणि आपण कासवाला कसेही हरवू हा विश्वास...

ससा त्याच्या अंगभूत वेगामुळे जोरात पाळायला लागतो पण कासव मुळातच संथ, त्यामुळे ते डुलत डुलत पण प्रामाणिक पणे चालत असतं...

साश्यानी आता जवळ जवळ निम्मं अंतर कापलेलं असतं... तो मागे वळून बघतो तर कासव अजूनही खूप मागे असतं... ससा स्वतःच्याच वेगावर जाम खुश होतो आणि विचार करतो कि "कासव अजून बरच लांब आहे... ते काही इतक्यात येऊ शकत नाही... म्हणजे आपण शर्यत जिंकलो हे जवळ जवळ निश्चित आहे... तर मग काय हरकत आहे, जरा चार खाऊ, गार पाणी पिऊ, आणि मग निघू"...

झालं... ठरल्या प्रमाणे ससा मऊ चार खाऊन, गार पाणी पेऊन जरा पेंगुळलासा होता आणि त्यात झुळझुळ वाहणारं वारं आपली जादू चालवत... साश्यावर झोपेची चादर पसरते आणि बघता बघता ससा अगदी गाढ झोपी जातो...

ससा झोपी गेला खरा पण इकडे आपलं कासव मात्र न थकता चालत होतं... मजल दरमजल करत त्यानी सश्या पर्यंतचा अंतर कापलं... झोपलेल्या सश्या कडे एक नजर टाकली आणि पळभरही विश्रांती न घेता मार्गस्थ झालं... त्याला आता फक्त डोंगराचं शिखर दिसत होतं...

होता होता दुपार टाळून गेली, संध्याकाळचं गार वारं वाहू लागलं आणि आपल्या ससोबाना जाग आली... पण आता मात्र त्यांची पाळता भुई थोडी झाली... त्याला आपण किती वेळ झोपलो याचा अंदाजच येईना... मग तो जी धूम ठोकतो ती थेट डोंगराच्या माथ्यावर..

पण बघतो तर काय... कासव आधीच तिथे पोचलेलं... त्याला घडला प्रकार कळतो... आणि जिंकलेल्या कासवा समोर खजील मानेने चालु लागतो...

Moral of the story - १. slow and steady wins the race   
                               २. consistency and perseverance gives you success 
                               ३. गर्वाचे घर खाली  

२---------------------------------------------

कासवा सारख्या संथ प्राण्या कडून हरलेला ससा आता पुरता शहाणा झलेला असतो... आणि हरण्या मुले जी नामुष्की झालेली असते ती आपण कधी एकदा धुवून टाकतो असा त्याला झालेलं असतं...

झालं... ससा पुन्हा कासवा कडे जातो आणि म्हणतो पुन्हा शर्यत लावू आपण... पहिल्यांदा मिळालेल्या अनपेक्षित विजया मूळे कासवाला जरा तसू भर मास चढलेलं असतं आणि ऐटीत तो सश्याला हो म्हणून जातो...

ठरलं.. त्यांची शर्यत सुरु होते... ह्यावेळी साश्यानी जिंकण्याचा चंगच बांधलेला असतो... तो सुसाट वेगानी पळत सुटतो आणि डोंगराचं शिखर गाठल्यावरच थांबतो...

अर्थातच कासव हरलेल असतं आणि साश्यानी त्याचं अपयश धुवून काढलेलं असतं...

Moral of the story - १. fast and furious wins the race 
                               २. encash your  strenghts and kill the competitor  

३..........................................................

आता मात्र कासव हट्टाला पेटलं... एकदा जिंकण्याची झिंग चढली कि हरणं सहन होत नाही... तो सारखा विचार करी... कि मी असं काय केलं पाहिजे ज्यानी मी सश्याला हरवू शकेन... आणि शेवटी त्याला एक नामी युक्ति सुचते...

ताड ताड पावलं टाकत तो साश्याकडे जातो आणि म्हणतो चल आपण परत शर्यत लावू... विजयी ससा ऐटीत  एक नजर कासवा कडे टाकतो आणि हो म्हणतो... पण कासव ह्या वेळी एक अट सांगतो... "डोंगरावरच जायचय पण मी सांगीन त्या मार्गांनी"... विजयाच्या धुंदीत ससा त्यालाही हो म्हणतो...

शर्यत सुरु होते.. थोडं अंतर कासावनी सांगितलेल्या रान वाटेनी ससा धावून कापतो न कापतो तोच त्याच्या समोर एक विशाल नदीचा पाट येतो... आणि पाटा समोर लगेच डोंगर... ह्यावेळी अंतर तर कमी पण पाण्याचा अडसर पार केल्या शिवाय गत्यंतर नाही... काय करू न काय नाही ह्या विचारात ससा असतानाच लुटू लुटू पायांनी कासव तिथे पोचतं.... सुरकन पाण्यात शिरतं आणि डोळ्यांचं पात लावतं न लावतं तोच पैल तीरावर पोचतं.... आणि हळू हळू पुन्हा शिखरावर चढू लागतं...

बिचारे आपले ससोब मात्र किनाऱ्या वरच गोरठून बसलेले... 

कासवाची युक्ति कमी येते आणि कासव पुन्हा एकदा शर्यत जिंकते...

Moral of the story - १. Work on your core competencies and specialize....

४---------------------------------------------

दोघातच लढाई करून आता मात्र ससा कासव bore झालेले असतात...

आता ते ठरवतात... आपण दोघातच कुठे लढत बसायचं... आपण सगळ्या जंगलाशी शर्यत लावूयात...

आणि ते असा मार्ग ठरवतात कि अर्धा रस्ता हि रानवट असतो आणि अर्धा रस्ता पाण्यातून जातो...

एकुणातच ससा कासवाच्या शर्यती संपूर्ण जंगलात खूपच famous झालेल्या असतात आणि इतर सगळे प्राणी ह्या दोघांशी शर्यत लावायाल तयार होतात...

शर्यत सुरु होते खरी पण पाण्यात राहणारे प्राणी जमिनी वर येताच मंदावतात आणि जमिनीवरचे प्राणी पाण्याला घाबरून बसतात...

पण इकडे ससा कासवाची जोडी चांगलीच यशस्वी होते कारण जमिनी वर ससा कासवाला आपल्या पाठीवर घेऊन पाळतो आणि पाण्यात कासव सश्याला आपल्या पाठीवर घेऊन पोहोते...

ह्या दोघांच्या या युती मूळे मी मी म्हणणाऱ्या प्राण्यांवरही हरण्याची पाळी येते...

Moral of the story - १. team work is always better than individual efforts...