Saturday, January 21, 2012

Kahi Goshti Haravu nayet mhanun - 1

ससा कासव and changing trends of management 

१---------------------

ससा आणि कासव दोघे हि शर्यत लावतात कि जो कोणी पहिला त्या दूरवरच्या टेकडी वर आधी चढून दाखवेल तो जिंकला... सश्याला आपल्या वेगाचा प्रचंड अभिमान आणि आपण कासवाला कसेही हरवू हा विश्वास...

ससा त्याच्या अंगभूत वेगामुळे जोरात पाळायला लागतो पण कासव मुळातच संथ, त्यामुळे ते डुलत डुलत पण प्रामाणिक पणे चालत असतं...

साश्यानी आता जवळ जवळ निम्मं अंतर कापलेलं असतं... तो मागे वळून बघतो तर कासव अजूनही खूप मागे असतं... ससा स्वतःच्याच वेगावर जाम खुश होतो आणि विचार करतो कि "कासव अजून बरच लांब आहे... ते काही इतक्यात येऊ शकत नाही... म्हणजे आपण शर्यत जिंकलो हे जवळ जवळ निश्चित आहे... तर मग काय हरकत आहे, जरा चार खाऊ, गार पाणी पिऊ, आणि मग निघू"...

झालं... ठरल्या प्रमाणे ससा मऊ चार खाऊन, गार पाणी पेऊन जरा पेंगुळलासा होता आणि त्यात झुळझुळ वाहणारं वारं आपली जादू चालवत... साश्यावर झोपेची चादर पसरते आणि बघता बघता ससा अगदी गाढ झोपी जातो...

ससा झोपी गेला खरा पण इकडे आपलं कासव मात्र न थकता चालत होतं... मजल दरमजल करत त्यानी सश्या पर्यंतचा अंतर कापलं... झोपलेल्या सश्या कडे एक नजर टाकली आणि पळभरही विश्रांती न घेता मार्गस्थ झालं... त्याला आता फक्त डोंगराचं शिखर दिसत होतं...

होता होता दुपार टाळून गेली, संध्याकाळचं गार वारं वाहू लागलं आणि आपल्या ससोबाना जाग आली... पण आता मात्र त्यांची पाळता भुई थोडी झाली... त्याला आपण किती वेळ झोपलो याचा अंदाजच येईना... मग तो जी धूम ठोकतो ती थेट डोंगराच्या माथ्यावर..

पण बघतो तर काय... कासव आधीच तिथे पोचलेलं... त्याला घडला प्रकार कळतो... आणि जिंकलेल्या कासवा समोर खजील मानेने चालु लागतो...

Moral of the story - १. slow and steady wins the race   
                               २. consistency and perseverance gives you success 
                               ३. गर्वाचे घर खाली  

२---------------------------------------------

कासवा सारख्या संथ प्राण्या कडून हरलेला ससा आता पुरता शहाणा झलेला असतो... आणि हरण्या मुले जी नामुष्की झालेली असते ती आपण कधी एकदा धुवून टाकतो असा त्याला झालेलं असतं...

झालं... ससा पुन्हा कासवा कडे जातो आणि म्हणतो पुन्हा शर्यत लावू आपण... पहिल्यांदा मिळालेल्या अनपेक्षित विजया मूळे कासवाला जरा तसू भर मास चढलेलं असतं आणि ऐटीत तो सश्याला हो म्हणून जातो...

ठरलं.. त्यांची शर्यत सुरु होते... ह्यावेळी साश्यानी जिंकण्याचा चंगच बांधलेला असतो... तो सुसाट वेगानी पळत सुटतो आणि डोंगराचं शिखर गाठल्यावरच थांबतो...

अर्थातच कासव हरलेल असतं आणि साश्यानी त्याचं अपयश धुवून काढलेलं असतं...

Moral of the story - १. fast and furious wins the race 
                               २. encash your  strenghts and kill the competitor  

३..........................................................

आता मात्र कासव हट्टाला पेटलं... एकदा जिंकण्याची झिंग चढली कि हरणं सहन होत नाही... तो सारखा विचार करी... कि मी असं काय केलं पाहिजे ज्यानी मी सश्याला हरवू शकेन... आणि शेवटी त्याला एक नामी युक्ति सुचते...

ताड ताड पावलं टाकत तो साश्याकडे जातो आणि म्हणतो चल आपण परत शर्यत लावू... विजयी ससा ऐटीत  एक नजर कासवा कडे टाकतो आणि हो म्हणतो... पण कासव ह्या वेळी एक अट सांगतो... "डोंगरावरच जायचय पण मी सांगीन त्या मार्गांनी"... विजयाच्या धुंदीत ससा त्यालाही हो म्हणतो...

शर्यत सुरु होते.. थोडं अंतर कासावनी सांगितलेल्या रान वाटेनी ससा धावून कापतो न कापतो तोच त्याच्या समोर एक विशाल नदीचा पाट येतो... आणि पाटा समोर लगेच डोंगर... ह्यावेळी अंतर तर कमी पण पाण्याचा अडसर पार केल्या शिवाय गत्यंतर नाही... काय करू न काय नाही ह्या विचारात ससा असतानाच लुटू लुटू पायांनी कासव तिथे पोचतं.... सुरकन पाण्यात शिरतं आणि डोळ्यांचं पात लावतं न लावतं तोच पैल तीरावर पोचतं.... आणि हळू हळू पुन्हा शिखरावर चढू लागतं...

बिचारे आपले ससोब मात्र किनाऱ्या वरच गोरठून बसलेले... 

कासवाची युक्ति कमी येते आणि कासव पुन्हा एकदा शर्यत जिंकते...

Moral of the story - १. Work on your core competencies and specialize....

४---------------------------------------------

दोघातच लढाई करून आता मात्र ससा कासव bore झालेले असतात...

आता ते ठरवतात... आपण दोघातच कुठे लढत बसायचं... आपण सगळ्या जंगलाशी शर्यत लावूयात...

आणि ते असा मार्ग ठरवतात कि अर्धा रस्ता हि रानवट असतो आणि अर्धा रस्ता पाण्यातून जातो...

एकुणातच ससा कासवाच्या शर्यती संपूर्ण जंगलात खूपच famous झालेल्या असतात आणि इतर सगळे प्राणी ह्या दोघांशी शर्यत लावायाल तयार होतात...

शर्यत सुरु होते खरी पण पाण्यात राहणारे प्राणी जमिनी वर येताच मंदावतात आणि जमिनीवरचे प्राणी पाण्याला घाबरून बसतात...

पण इकडे ससा कासवाची जोडी चांगलीच यशस्वी होते कारण जमिनी वर ससा कासवाला आपल्या पाठीवर घेऊन पाळतो आणि पाण्यात कासव सश्याला आपल्या पाठीवर घेऊन पोहोते...

ह्या दोघांच्या या युती मूळे मी मी म्हणणाऱ्या प्राण्यांवरही हरण्याची पाळी येते...

Moral of the story - १. team work is always better than individual efforts...