Saturday, August 27, 2011

Jeevan tyana kalale ho...

रुक्साना.... काश्मीरच्या दूर्गम आणि आतंकवाद बाधित एका पाड्यावरची, १९ वर्षांची तरुणी... नववी पर्यंत शिकूनही आपल्या इथल्या अशिक्षित मुली पेक्षाहि जाणवण्या इतपत कमी आत्मविश्वास... साहजिक च आहे म्हणा, zero exposure... पण अश्या ह्या मुलीनी भल्या भल्यांना तोंडात बोटं घालायला लावणारा पराक्रम केला त्या विरांगने ची हि गोष्ट... २००९ सालच्या शेवटी शेवटी घडलेली...

काश्मीर मध्ये आतंकवादी आणि नागरिक गेले कित्येक वर्ष एकत्र राहतात... त्यातल्याच ३ अतिरेक्यांची वाईट  नजर रूढार्थाने सुंदर नसलेल्या रुक्साना वर पडते.. निर्लज्जपणे ते तिच्या कडे तसा प्रस्ताव हि ठेवतात, रुक्साना त्यांना झिडकारून घरी येते आणि अपेक्षे प्रमाणे रुक्सानच घरा बाहेर पडणं मुश्कील होऊन जातं... (रुक्साना मुस्लीम म्हणून त्या अतिरेक्यांना काही कणव नसते... धर्म युद्धाच्या नवा खाली विकृती पोसणारे दानव हे) तरीही ती धीराने सामोरी जात असते.. एक दिवशी रात्री अतिरेकी सरळ तिच्या काकाच्या घरात दाखल होतात आणि धमकावून रुक्सानच घर दाखवायला सांगतात... जीवाच्या भयाने तोही मुकाट त्यांना रुक्सानाच्या घरी घेऊन येतो.. 

बंद दार उघडत नाहीत हे बघून, ते दार तोडून अतिरेकी रुक्सानाच्या घरात शिरतात... इकडे रुक्सानाच्या घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकते... पण अल्ला कि मेहेरबानिसे रुक्सानाला बाजे खाली लपवण्यात तिची अम्मा यशस्वी होते...

आधीच वासनेने आणि रागाने आंधळे झालेले अतिरेकी ती दिसत नाही म्हणून वेडे पिसे होतात... तिच्या घरच्यांना मारपीट सुरु होते... रुक्साना तर त्यांना हवीच असते पण आता त्यांची अजून एक मागणी असते कि तिच्या धाकट्या भवानी अतिरेक्यांचा गटात सामील व्हावं... 

त्यांच्या ह्या मागण्यांना रुक्सानाच्या घरचे बधत नाही म्हणाल्यावर त्यांच्या वर बंदूक उगारतात... बाजे खालून हे सगळं बघत असणाऱ्या रुक्सानाला अचानक काय प्रेरणा मिळते माहित नाही... बाजे खालीच पडलेली कुऱ्हाड उचलून रुक्साना बाहेर येते आणि एका अतिरेक्याच्या पाठीत सणसणीत वार करते... तो तिथल्या तिथे कोसळतो.. ह्या अनपेक्षित हल्ल्यांनी बावचाललेला दुसरा अतिरेकी तिच्या काकावर गोळी चालवतो.. हि बया त्याच्यावरही हल्ला चढवते आणि त्याला हि जखमी करते... तिचा हा अवतार बघून दोघे हि अतिरेकी पळून जातात...

आपल्याला बरं वाटतं.... गोष्टी चा सुखांत झाला... गोष्ट संपली... पण नाही गोष्टं अजून अर्धीच आहे... हे आपल्याला KBC (कौन बनेगा करोडपती) चा एपिसोडे पुढे गेल्यावर कळत... कारण एका special segment under रुक्सानाला KBC मध्ये बोलावलेला असतं... social responsibility म्हणून खूप स्तुत्य प्रयत्न...

अत्यंत बुजरेपणे, कावरी बावरी रुक्साना प्रवेश करते... तिला प्रश्नही सोपे विचारले जातात... आपल्याला काहीही न गमावता charity केल्याचे समाधान मिळतं... तिचा विषयी चा अभिमान कमी होऊ लागतो... आणि त्याची जागा तिच्या विषयी वाटणारी कीव घेते... आणि  आपला ego मोठा होतो... (सोपे प्रश्न मुद्दाम दिलेत आणि हे माहित असूनही आपण show बघतोय, trp वाढवतोय म्हणजे उपकारच नाही का)

असो... मग अमिताभ बच्चन तिला विचारतो कि "५ करोड रुपये... क्या किजीयेगा इतने सारे पैसोन का" म ती सांगते कि "मुझे मेरे बच्चे के लिये घर बनाना हैं..." (आपल्याला आश्चर्य वाटतं कि ह्या पोरसवदा मुलीला मुलगा आहे?) आपलं social मन अजून हळहळत आणि ego अजून वाढतो...

होता होता ती एक लाख साठ हजार रुपये जिंकते... अमिताभ पुन्हा विचारतो, कि काय करणार या पैशांचं...? आणि मग ती जे उत्तर देते त्यांनी सणसणीत चपराक बसते आपल्याला... धाड्कन जमिनीवर येतो आपण... ती म्हणते "साठ हजार गरीबो मैं बाटूंगी और एक लाख मैं घर"...

च्या मारी... जेव्हा आमच्या कडे २ BHK घर होतं तेव्हा मोठं घर हवं होतं आता ४ BHK आहे तर interior करायचं.... charity तर माझ्या मनाला शिवतही नाही... आणि हि बाई जिच्या तान्ह्या बाळासाठी घर नाही ती स्वतःला मिळालेल्या अवघ्या १ लाख ६० हजारातले ६० हजार असेच देऊ करते...? (आणि हे आपल्याला माहित असतं कि हा काही publicity stunt नाही कारण सुदैवानी exposure च नसल्यानी ह्या गोष्टींचा तिला स्पर्श हि झलेला नाही... जे काही आहे ते निर्भेळ...)

इथेच हे सगळं थांबत नाही... अजून आपल्या लाजेची काही लक्तरं टांगायची बाकी असतात...

बोलता बोलता कळत ज्या अतिरेक्यांना हिने पळवून लावलेलं असतं त्यांनी फतवा काढलेला आहे (वर्तमान काळ मुद्दामून वापरलाय)... कि हिला जो कोणी त्यांच्या स्वाधीन करेल त्यांना ६ लाख रुपये मिळतील... (आहो आपल्याला हि रक्कम मोठी वाटते म कोण्या एका उपाशी खेड्यातला कोणालाहि हि रक्कम मोठी च आहे)

मग तिला अमिताभ म्हणतो तुला भीती नाही वाटत ह्या सगळ्याची...? तर पठ्ठी म्हणते "भ्यायचं का? जिस अल्ला ने उस वक़्त बाचाया वो अभी भी बचायेगा..."

अजून एक चपराक.... अरे देवा... एवढ्या तेवढ्या कारणाने देवावर रागावणारे आपण आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीत असूनहि देवावर अढळ विश्वास असणारी हि रुक्साना...

त्यापुढे जाऊन अमिताभ विचारतो कि नववी नंतर का शिकली नाहीस तर तिचं उत्तर असतं अतिरेक्यांनी शिकून दिलं नाही... मुली शाळेत निघाल्या कि त्यांना रस्त्यात अक्षरशः बदडून काढलं जायचं (दैत्यच ते...)

मग बोलता बोलता तिच्या नवऱ्याशी - कबीर शी आपली ओळख होते...हिच्या चेहऱ्या वरून हीचं बाल्य हि हटलेल नाही... आणि तिचा नवरा प्रौढ असा तिशी गाठलेला  "माणूस"??? का बरं....? 

मग कळत.... तिच्या protection साठी government नि police मध्ये काम करणाऱ्या कबीर ला नियुक्त केलेलं असतं... तो म्हणतो कि हिला जेव्हा बाहेर जायचं असायचं तेव्हा मी तिला जीप नि घेऊन जायचो आणि अतिरेकी आले कि सीट खाली लापावायचो... मी तिला सांगितलं होतं कि पहिली गोळी मी खाईन आणि मगच तुला काहीतरी होईल...

कबीर च्या protection खाली दिवस चालू असतात पण तिच्याशी कोणी लग्न करायाल तयार नसतो... कारण त्या फतव्यात हे हि लिहिलेला असतं कि जो कोणी हिच्याशी लग्न करेल उसके पुरे खानदान का खात्मा होगा...

ह्याही वेळी तिच्या मदतीला कबीर धावून येतो आणि स्वतःचेच नाही तर कुटुंबाचे प्राण धोक्यात असतानाही तो तिच्याशी निकाह करतो... (म्हणून एवढा मोठा नवरा) अजून एक चपराक... खाड...
पण लग्न झाल्यावर त्यांचा त्रास वाढतो.. अतिरेक्यानपायी त्यांना त्यांचे गाव सोडून पळून जावं लागतं... (म्हणून नसतं त्यांचं घर...)

आता मात्र आपण पूर्ण नामोहरम झालेलो असतो... आणि आपल्याला प्रश्न पडतो कि आयुष्य कोणाला कळलं हो...? उच्च विद्या विभूषित, AC office मध्ये बसून fb वर, किंवा ५ star हॉटेल मध्ये बसून चर्चा करणाऱ्या आपल्याला कि काश्मीरच्या एका दुर्गम खेड्यात राहणाऱ्या अर्धशिक्षित रुक्साना ला....???

Friday, August 19, 2011

Vanawa pet ghet aahe...

They say history repeats... and I had no reason to believe it till yesterday... But now I do.. I strongly do...

It had happened in the early 20th century... when Mahatma Gandhi called for a peaceful war against British raj.... and now its happening again in the early 21st century when Shri Anna Hazare called for a peaceful war against "our own" corrupt government... Yes it happens only in India that peaceful agitators shake the strong pillars of unauthorized / unjustified government...

 Now India has accepted Anna Hazare and his capable team to lead her in the war against corruption... Whole nation is resonting with his call.... there are peaceful agitations, rallies, silent marches, candle walks and most importantly - 'traffic jams' (because of rallies) we are proud of...

There are rounds of anshans, there is FL (fasting leave), there is holi (fire) of government version of lokpal bill, there is civil order disobedience, there is movement of self arrest and what not.... India is burning...

Every nook and corner of India wants an Indian political system free from corruption... Be it a small village in the interiors of Assam or a posh locality in a breath taking skyline of Mumbai... Every where there is a loud scream against corruption... because we have had enough of it... we are really tired of it and we want to get rid of it now... NOW....

Every Indian wants a corruption free India... Bharat is protesting as hard as India is... The class is fighting and mass is fighting too... teens are fighting, youths are fighting, middle aged and age olds are fighting too... Males are fighting and females are fighting too... Industrialists are fighting and artists are fighting too... No one wants to be left behind in this war against the political system that just not supports but protects the corrupts... (Doesn't it remind us the history lessons?)

So true Anna is when he calls this struggle as 2nd Freedom Fight of India!... We are now very well determined  to end this 64 year long (counting from 15th August 1947) era of corrupt India...

Media is also playing a very critical role in shaping up this freedom struggle... One must appreciate its commitment to this cause... The amount of coverage they are giving to whole of this act is really benefiting the Anna's team...

... plus the best part of this 2nd freedom fight (and which was lacking in early 20th century) is the wide spread of social media... we have one more channel to vent out our anger and rage... Almost every one is updating there FB statuses with a word or two against corruption... Few say "I am Anna", few of them are cursing government, few of them supporting Anna, few of them have pledge to change their profile photographs to Anna's photo till the time we win this battle... Though negligible but this has helped to spread the awareness among the youth...

**********************************************************************************
Pune Bulletin -
Rally from Balgandharva to Alka, SP college rally on Tilak Road, Agitations on Sinhagad Road
**********************************************************************************
Actually if you see this war is not against any particular political party... Its against the whole system which feeds corruption... and broadly speaking no single party is an option to this.... but this time it happens to be UPA.. They have screwed it big time... Now its time for them to bare the brunt...

Thankfully our corrupt government has already shown the signs of their weakening stand by accepting conditions of Anna... Now nothing much is left in their hands when whole India has awaken to the needs of time... So now there is much surety that long awaited "Jan Lokpal Bill" will see the light of the day with out much of  a modification, as like RTI (Right to Information) Act...

RTI backfired the government and JLB will do the same task even more ferociously...

... and for this we must give whole credit to Shri Anna Hazare who holds the power to fire the asses of generally 'peace loving' Indians and ably directing us through this 'do or die' war against corruption...

Sounds good...??? But wait.. there is no end to this here...

Its fine we are all burning now and the JLB shall pass through the parliament... But real challenge is to keep this fire burning till coming assembly elections... and because we are very forgiving and I would not wonder if this totally corrupt government again comes in power in 2014... 3 years is quite a span.... (this is the only drawback of this fight) and if this happens then there would not be any shameful event in the history of India as this...

I agree that we do not have any better option than UPA as (though UPA has a long history of corruption), BJP and allies do not have any trustworthy leader to offer us... but still I would suggest that we keep on changing our governments every 5 years for at least next 20 - 25 years. This will make the political stage little turbulent every 5 years and stock markets would drop a little on the backdrop of this unstable government but this is the price we need to pay for allowing 64 years of corruption... this will ensure that there is enough manthan (churning) and we get the nectar in the form of corruption free India... (Each and every Indian should vote for this to happen ... and should vote religiously...)

P.S.: This is my 1st blog in English because unfortunately very few would take the pain to read it if it would have been written in Marathi... and I want more and more people to read this one and take the oath to vote in every single election and as long as they are living...

Monday, July 25, 2011

Tajmahal kharach ekadach banu shakato ka..???

नाई, title आणि खालील blog चा काही direct संबंध नाहीये.. खरतर नुकताच झीन्दगी ना मिलेगी दोबारा... पाहून आलोय आणि झोया अख्तर सारख्या माझ्या खूप लाडक्या दिग्दर्शिके कडून घोर निराशा पदरी पडून घेतलीय..

आज वरचे तिचे दोन्ही चित्रपट - honeymoon travels Pvt . Ltd . आणि luck by chnace मला कमालीचे आवडलेले चित्रपट.. honeymoon मध्ये परीकथे सारख्या गोष्टी आहेत पण दोन्ही चित्रपटानमध्ये खूप जबरदस्त पटकथा आहे.. luck by म्हणजे तर तिची सर्वोत्तम निर्मिती.. दोन्हींमध्ये अगदी आपल्यातली वाटणारी पात्रं... हृदयाला भिडणारी त्यांची नाती, कथा आणि व्यथा..

आणि इतक्या २ fundoo चित्रपटान नंतर तिचा हा नवा चित्रपट... म्हणजे अर्थातच अपेक्षा कमालीच्या उंचावलेल्या... त्यातून इतकी तगडी star cast... कितीही रुपायचे ticket असू देत.. मी चित्रपट पाहायला गेलो आणि २०० रुपये देऊन स्पेन ची सांस्कृतिक, भौगोलिक इत्यादी माहिती असलेली discovery वरची एक ३ तासांची short film पाहून आल्या सारखा वाटलं...

म्हणजे दृश्य अगदी नयनरम्य.. fear factor वाले stunts हि एक सेकंद काळजा चा ठेका चुकवतात.. पण झोया सारख्या आत्यंतिक realistic दिग्दर्शिकेला  अशी larger than life presentation ची काय गरज भासावी..?? आणि चित्रपट पाहिल्यावर (मला माहितीय कि मी picture किती हि वाईट आहे हे सांगितलं तरी तुम्ही तो जाऊन बघणार कारण याचं मार्केटिंग च इतकं छान केलाय आणि कदाचित तुम्हाला तो आवडेल हि.. कारण मला फार थोडे चित्रपट आवडतात..) तुमच्या सहज लक्षात येईल कि मुळातच पटकथेत काहीच दम नसल्यानी तिला कारण जोहर सारखी बिग budget फिल्म काढणं भागच होता नाहीतर कोणीच तो चित्रपट पहाणर नाही..

असो.. चित्रपटात गोष्ट आहे तिघा लंगोटी यारांची.. (असं ते म्हणतात म्हणून कळत पण सबंध चित्रपटात त्यांची ती गहिरी मैत्री वैगरे जी काय आहे ती कुठेच साधी जाणवतही नाही मनाला शिवून जाण तर दूरच राहिलं.. त्याच विरोधात DCH किंवा RDB मधली ३ ची मैत्री कशी मनात घर करून राहते..) तर असे हे तिघे त्याच्यातील एका मित्र च्या bachelor party ला स्पेन ला जातात... म्हणजे तसे त्यांनी clg मध्ये असताना ठरवलेले असते.. आणि त्यांनी असे हि ठरवलेले असते कि तिथे गेल्यावर प्रत्येक जण एक adventure sport ठरवेल आणि तो तिघानाही खेळावा लागेल.. आणि प्रत्येकांनी ठरवलेला तो sport हे इतर दोघान साठी surprise असेल..

तर अश्या या ३ मित्रांची स्पेन मधली adventure सफर फारशी कुठली हि वळण ना घेता २.५ - ३ तासांनी संपते.. संपते बाबा एकदाची...

नाही म्हणायला चित्रपट काही काही punches खूप छान आहेत.. आपल्याला हसू हि येत पण ३ तासान नंतर हाती काहीच लागत नाही.. काहीतरी मस्त, कमाल, धमाल, entertaining असं काहीच आपण पाहिल्याचं वाटत नाही...

मला हेच कळत नाही कि जर हे तिघे अगदी शाळे पासूनचे घनिष्ट मित्र आहेत तर आपला जवळच्या मित्राची सोच कि पोहोच काय असेल हे आपल्याला कळत नाही..?? म्हणजे आपण आपल्या जवळच्या मित्र बरोबर हे एकदाही बोललेलो नसतो कि माझी अशी अशी fantacy आहे कि बाबा मला हा हा खेळ एकदा तरी खेळावासा वाटतो???... म कसले हे मित्र.. भले ते ४ एक वर्षांनी एकमेकांना भेटतात तरी इतके ते बदलेले असू शकतात ह्यावर माझा विश्वास नाही..

त्यातून प्रत्येकांनी खेळ सांगितल्यावर एक सारखी स्टोरी. उरलेल्या दोघान पैकी एकाला त्या perticular खेळाबद्दल फोबिया असतो.. म्हणजे ह्रितिक ला पाण्याची भीती, फरहान ला उंची ची भीती, अभय ला त्या बैलान मागे पाळण्याची भीती.. पहिल्या २ game ला instructor training देणार.. इतकी repetative story... का..??? झोया अशी का वागली..??? आणि ह्या adventure sports मधून मधून मसाला काय तर tomatino festival, सेनोरिता चा तो salsa का काय तो dance, एक tap dance etc... आवरा!!!

गाणी हि अशी बकवास कि एक लक्षात राहील तर शपथ.. ते एक सेनोरिता लक्षात रहात पण पहिल्या अंतऱ्या नंतर ते हि रेपेतातीवे वाटतं...

आता नवीन आलेल्या multiplex सिनेमा च्या मनानी खूप कमी कलाकार असूनही, group मध्ये कोणाही एकाचं वेगळे पण लक्षात राहत नाही.. (चूक सगळी दिग्दर्शिकेची..) group मध्ये एक मेकांच्या reaction खाल्ल्या जातात.. आपण एका कडे बघत असलो कि दुसरा काय expression देऊन गेला कळत ही नाही.. अरे काय नाटक आहे का..?? सिनेमा वेगवेगळे shots घेऊन प्रत्येकाच्या reactions capture करून edit करता येतो हे झोया विसरली कि काय.. आणि मुळात charactors वेगळे असूनही कोणीच असं वेगळा ठसत नाही.. (चूक सगळी संवादलेखकाची..) आणि त्या कलकी कोच्लीन ला हेरोईन कोणी केले यार.. ती का आहे..???

चित्रपटात anti climax, climax तंत्रचा वापर केलाय पण कुठलाच climax, climax वाटत नाही...

सुंदर दिसणारी कतरिना आणि नयनरम्य स्पेन ह्याच काय त्या चित्रपटाचा जमेच्या बाजू...

झोया plz पुढची फिल्म atleast आधीच्या फिल्म्स एवढी तरी चांगली असू देत..


Monday, June 20, 2011

Ekeshwarwad aani law of Conservation of Energy

Energy can neither be created nor be destroyed. It can just be transformed from one form to another and the total amount of (mass and) energy in the universe always remains constant...

उर्जा तयारही करता येत नाही आणि संपवातही येत नाही. तिचे फक्त एका रूपातून दुसऱ्या रुपात रूपांतरण होऊ शकते. विश्वातील एकूण उर्जेचे प्रमाण हे कायम तेच राहते.

साधारणतः इयत्ता आठवीत शिकलेला, तेव्हा कळलेला (आठवीत Newton चा हाच एक नियम कळू शकतो असं माझं ठाम म्हणणं आहे) आणि आवडलेला (कारण पाठ करायला सगळ्यात सोपा) असा हा नियम...

हा नियम एकेश्वरवादाचा उद्घोषक आहे हा आताच मला झालेला साक्षात्कार.. साक्षातकरच म्हणावा लागेल कारण हे अध्यात्माशी वगैरे related आहे ना... पण ज्यांना नास्तिकतेचा अथवा विज्ञाननिष्ठतेचा tag मिरवायला आवडतो त्यांना हा नियम नाकारून चालणार नाही आणि त्यामुळे unknowingly का होईना पण ते एकेश्वरवादाचाच स्वीकार करत असतात...

एकेश्वरवाद सांगतोः 'की जग हे अद्वैत आहे'. अद्वैत म्हणजे एक आणि एकच. पाश्चिमात्यांनी आपला समज करून दिलाय की हिंदू धर्म हा 'polytheism' वर आधारीत आहे कारण आपण so called ३२ कोटी देव मानतो.  पण वास्तविक पाहात हिंदू धर्म सांगतो देवाला कुठल्याही रूपात माना, सरतेशेवटी, तो परमात्मा एकच आणि अविनाशी आहे. हाच 'अद्वैत'भाव (अद्वैत = न द्वैत = दुसरा नसलेला) एकेश्वरवादाचं मूळ सूत्र आहे.

हिंदू धर्मात आपल्याला कायम सांगितलं आहे कि ईश्वर हा निराकार, निर्गुण आहे. (त्याला रंग नाही, रूप नाही, गुण नाही, भाव नाही...) यालाच हिंदू धर्माने परमात्म्याची संज्ञा दिलेली आहे. (गणपती, शंकर, विष्णू हि त्यांची सदेह रूपं. केवळ आपल्याला परमात्म्याशी connect होता यावं म्हणून आहेत). तर आता मी परमात्मा हीच 'total amount of energy in the universe ' आहे असं का म्हणतो ते बघा :

१. परमात्मा अनादी आहे - energy can neither be created 
२. परमात्मा अनंत आहे - energy can nor be distroyed  
३. परमात्मा उंश रूपाने आपल्या सगळ्यां मध्ये व्यापून राहिला आहे - it can just be transformed from one form to another   
४. परमात्मा निराकार, निर्गुण आहे (तो (देव (खरतर मला हा शब्द मान्य नाही पण तरीही))) दिसत नाही, अनुभवावा लागतो ) - energy हि दिसू शकत नाही पण तिच्या प्रत्यवाय आपणास येतो आणि आपण energy आहे हे मान्य हि करतो (ते Newton नि लिहून ठेवलाय ना, जर हिंदू पुराणात लिहिलं असतं तर मग आपण ते अमान्य केलं असतं..)

आणि आपण अगदी बोली भाषेत म्हणत असतो कि काही काम करण्याची energy च नाही ह्याच energy ला आत्मा हि संज्ञा वापरली आहे.

५. हिंदू संस्कृतीची पुनर्जन्माची concept - transformation of energy from one form to another
६. आपण मान्य केलेला कर्माचा सिद्धांत सांगतो कि आपण जसे कर्म (काम) करतो तशीच गती आपल्याला अर्थात आपल्या आत्म्याला मिळते. म्हणजेच कर्म आणि आत्मा हे interrelated आहेत.. - त्याच प्रकारे energy (आत्मा) आणि work (कर्म) interelated आहेत. अगदी physics च्याच terminology मध्ये बोलायचे झले तर both work and energy are measured in 'joules '...
७. अजून थोड खोलात शिरलो तर कार्मिक सिद्धांत म्हणतो जर तुम्ही कुठलं हि चांगलं काम केलंत तर पुढचा जन्म चांगला मिळेल. - we know that Work = f (Force ) आणि Energy = f (work ). अर्थात आत्म्याला जसा force आपण लावू आत्म्याला तशी गती मिळेल. आणि जो पर्यंत हे Force neutralize होत नाहीत तोपर्यंत Energy चे रूपांतरण चालूच राहणार... म्हणजेच जन्मजन्मांच्या साखळीत आत्मा अडकतच राहणार... जेव्हा आपण कूठला हि Force लावणं बंद करू म्हणजेच जेव्हा आपल्या वासना, इच्छा संपतील (यालाच हिंदू धर्मात निष्कामकर्मयोग असं म्हणालं आहे). तेव्हा Energy चे रूपांतरण थांबेल... it will become part of total  amount  of Energy in the universe अर्थात आत्मा परमात्म्यात विलीन होईल... आपल्याला मुक्ती मिळेल...   
८. हिंदू धर्म फक्त सजीवांबद्दल बोलून थांबत नाही तर तो म्हणतो या चारचार (सजीव आणि निर्जीव) सृष्टीत वावरणाऱ्या मधील आत्मा हा एकाच आणि अविनाशी आहे. म्हणजेच दगड धोंडे, माती, पाणी, हवा, पृथ्वी, सूर्य, चंद्र, आकाशगंगा या सर्वान मधेच परमात्म्याचा वास आहे (नरसिंह ची गोष्ट आठवतीय..?? परमेश्वर सगळी कडे आहे). आता असं बघा, निपचित पडलेल्या दगडात कूठला परमात्मा..??? पण कुठली हि स्तब्ध गोष्टीत PE (potential Energy असतेच ना). वाहत्या पाण्यात KE (kinetic Energy असते). सूर्य, पृथ्वी, चंद्र इत्यादिन मध्ये gravitational Force असतो म्हणजे एका प्रकारची उर्जाच असते... (remember E =f(w ) = f(F)). आणि जेव्हा scientists म्हणतात सूर्य मारणार आहे तेव्हा त्याला हि आपल्या सारखेच जन्म मृत्यू चे नियम लागू होतात हेच नाही का सिद्ध होत...
९. हीच concept पुढे न्यायाची तर ज्योतिषशास्त्रालाहि आधार सापडतो... जर दूरवरच्या चंद्र, सूर्यामुळे पृथ्वी वर वादळ येत असतील, ऋतू असतील, भारती ओहोटी होत असतील तर मग हेच दूरस्थित ग्रहगोल आपल्या आयुष्यावर का परिणाम घडवून आणू शकणार नाहीत.. कारण at the core हे ग्रहगोल हि Energy च आणि आपण हि Energy च.. 


आता प्रश्न पडतो कि जर परमात्मा अशी कोणी व्यक्ती नाही, ती एक उर्जा आहे तर मग गणपती, ब्रह्मा, इंद्र हे कोण आहेत??? हि आहेत आपल्या अल्प मतीस निर्गुणाची कल्पना पचनी पडावी म्हणून पराम्यात्म्याला दिलेली मूर्त रूपं... आपल्याला जो आकार जवळचा वाटतो, त्याची भक्ती करावी.. अर्थात तिथे आपली सगळी उर्जा एकवातावी म तिला unbalanced forces मिळणार नाहीत आणि आपल्याला मुक्ती मिळेल.. मग आता आपल्याला शंका येईल कि जर आपण परमेश्वराचं अमूर्त रूप स्वीकारला तर मंदिरांची काय गरज? पण मंदिरा महत्वाची आहेत कारण तिथे वर्षानुवर्षे अगणित लोकांच्या positive energies (त्यांचा देवावर असलेल्या विश्वासाच्या रूपाने) समाविष्ठ असतात...


वेद उच्चार, जपजाप्य, होमहवन, मंदिरातील घंटा हे सर्व का? कारण हे सर्व वेगवेगळ्या energies च आहेत (sound Energy , light and fire energy)...


हां... दमलो... वरचे विचार खूप विस्कळीत आहेत.. त्यांना एक बांधेसूद रूप द्यायची इच्छा आहे... तुम्ही सगळ्यांनी दुवा करा (तुमची दुवांच्या रूपाने positive Energy मला द्या...)


इति परमेश्वरर्पनमस्तुI...

Thursday, May 26, 2011

Ek Apratim Kalakruti hota hota rahilela chitrapat - Balgandharva

तसे  बरेच  दिवस  झहाले  हा चित्रपट पाहून... बरेच दिवस लिहायचं लिहायचं म्हणत होतो पण राहून गेलं...

तर अगदी खरा सांगायचं तर मला हा चित्रपट बघावाच असं काही वाटत नव्हतं... आणि त्यातून आमच्या भावी अर्धांगाने खूप काही  सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नव्हती... so थोडक्यात खूप काही अपेक्षा ठेवून गेलो नव्हतो..

पण सुरवाती पासूनच चित्रपटाने गती पकडली...

बाल - बालगंधर्वांचे काम करणाऱ्या मास्टर अथर्व कर्वेनी कमाल केली.. शास्त्रीय गायकाचे इतके बरोब्बर हावभाव त्यानी पकडलेत कि क्या बात हैं! 

आणि थोड्याच वेळात सुरु होतं सुबोध भावे युग... सबंध चित्रपट तो अप्रतिम आहे (माकेउप - विक्रम गायकवाड)... खरच एका स्त्रीला लाजवेल असं तो दिसतो... फक्त जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याच्या धिप्पाड अगं काठी मुले तो पुरुष आहे हे जाणवतं...
पण चेहरयावर अप्रतिम लावण्य... 

अगदी पहिल्या दृशा पासूनच आपल्यावर अभिनयाने तो जबर पकड बसवतो.. बालगंधर्वांचे जेव्हा लग्न एका काळ्या कुरूप मुली बरोबर लावून दिले जाते आणि आंतरपाट दूर झल्यावर त्यांच्या जेव्हा हे लक्षात येते तेव्हाचा धक्का, बायकोच्या इच्छे खातर लग्नाच्या पहिल्याच रात्री स्त्री रुपात येणारे बालगंधर्व,  स्वतःची मुलगी जाते तरी ते रसिकांचा रस भंग होऊ नये म्हणून प्रयोग करतात, मस्त पैकी सर्व विसरून गात असतात पण सहकलाकार मात्र त्यांच्या दुखामुळे रडत असतात हे जेव्हा बालगंधर्वांच्या लक्षात येते आणि नकळत त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागते तेव्हा एक बाप म्हणून त्यांच्या वेदना आणि एक अभिनेता म्हणून सुटलेल्या सांयामाने होणारा त्रागा, त्यांचे अनेकोनेक सहकलाकार देवाघरी जाताना संयत पणे व्यक्त होणार बालगंधर्वांचे अपार दुखं, भारताच्या स्वातंत्र्य साठी आपण काहीच कसे करत नाही याची बालगंधर्वांना लागलेली बोच, जवळच्या मित्रांनी पार फसवल्यावर देणेकार्याला  सामोरे जाणारे धीरोदात्त दिढमूढ बालगंधर्व, एकसंधता नसल्यानी चित्रपट चित्रीकरणात न रमलेले बालगंधर्व, असे अनेक प्रसंग आजही माझ्या मनात कोरलेले आहेत.. आणि अभिनयाचा कळस म्हणजे जेव्हा एका (शेवटच्या) प्रयोगात गात असताना त्यांची कवळी पडते आणि आजारी असल्यानी त्यांच्या घशातून आवाजही फुटत नाही तेव्हा सुबोध भावेंनी दाखवलेली अगतिकता, राग, दुखं, दैन्य, पराकोटीची वेदना (घाश्यामुळे) ह्याला जगात तोड नाही... ह्यावर्षीचा अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळायलाच हवा..

गडकरी (मनोज कोल्हटकर) समर्पक, बालगंधर्वांची पत्नी (विभावरी देशपांडे), त्यांची आई (सुहास जोशी) नेहमी प्रमाणेच अजोड... अमित केळकर आणि सिद्धार्थ चांदेकर गोड दिसलेत पण त्यांना आणि किशोर कदम यांना दुर्दैवानी फारसा वाव नाही... अविनाश नारकर, सागर तळाशीकर हि चपखल.. राहुल सोलापूरकर आणि मनोज जोशी हि उत्तम..

अनंत कान्हेरे ने ऐन प्रयोगात केलेला general Diar (बहुतेक याचाच) चा  खून आणि मग देशभक्ती ने चढणारे स्फुरण आणि अंगावर काटे अजून ताजे आहेत..

चित्रपटाच्या अजून काही जमेच्या बाजू म्हणजे उच्च निर्मिती मुल्ये... निर्मितीत नितीन देसाईनि कुठेहि हात आखडता घेतलेला नाही... चित्रपटाच्या मध्यंतरा वेळी होणारी प्रकाश योजना केवळ अप्रतिम (dop - महेश लिमये) ... मायसाभेचा देखावा नेत्रदीपक.. ज्या चित्रकारांनी तो चितारलाय त्याला सलाम.. मायासाभेची अथांग खोली त्यानी द्विमितीय चित्रात दाखवलीय.. गुणी कलाकार.. वेशभूषेत (costume - नीता लुल्ला) विशेषतः बालगंधर्वांच्या साड्यांसाठी जो पैसा ओतलाय तो समर्पक.. चित्रपटात म्हणाल्या प्रमाणे खरेच नवी fashion यावी इतक्या सुरेख.. कोल्हापूर चे पाणलोट क्षेत्र इतका सुरेख चित्रित झहालय कि थक्क व्हावं... png चे दागिने हटके तरीही कालसुसंगत... आणि एकूणच उभा केलेला जुना काळ, इतर सेट सर्व वाखाणण्या जोगं...

कौशल इनामदार चे संगीत एक सुखद धक्का.. सर्वच गाणी छान जुळून आलीयत.. पण विशेष उल्लेखनीय गाणं झहालय राहुल देशपांडेच... संगीत एवढे छान कि माझ्या सारख्या संगीत नाटकान पासून लांब पाळणाऱ्याला हि एकदा तरी संगीत नाटक बघावं हे वाटावं... (lyrics - स्वानंद किरकिरे)

(writer ) अभिराम भडकमकर हि संवादातून जुना काळ आपल्या समोर उभा करतो, कुठेहि प्रवाही पण न जाता..

खरतर एवढा कौतुकाचा वर्षाव तरीही अप्रतिम कलाकृती का नाही? तर मध्यंतरा आधीचा चित्रपट कमालीच वेगवान आणि धरून ठेवणारा... पण त्यानंतर चा भाग हा खूप drag झहाल्यासारखा... इतका कि हे दोन भाग वेगगळया दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेत कि काय असे वाटावे... बालगंधर्व आणि गोहर बाई चे नाते हि पूर्ण उलगडलेले नाही असे मला वाटले.. (editing - प्रशांत खेडेकर)

पण तरीही दिग्दर्शक रवींद्र जाधव नि पुन्हा एक सुरेख कलाकृती सदर केलीय हे निर्विवाद... आणि मला हा चित्रपट पुन्हा बघयला हि आवडेल..